डीसीएम देवेंद्र फडणवीस | महाराष्ट्र सरकार का फैसला – किसानों के लिए आर्थिक सबक।
DCM Devendra Fadanvis | Maharashtra government's decision - economic lesson for farmers.
देवेंद्र फडणवीस | महाराष्ट्र सरकारचा निर्णय – शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ | मागील वर्षी खरीप हंगामात कमी दर मिळाल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजारांची नुकसान भरपाई सरकारने दिलीय. राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. ४ हजार २०० कोटींचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आलं.
https://youtu.be/6ilAadoVCDk?si=U7ejq5P-ZRhH46vW
एवढचं नाही तर केंद्र सरकारने सोयाबीनच्या एमएसपीत २९२ रुपयांची वाढ करीत प्रतिक्विंटल ४८९२ रुपये देण्याचा निर्णय घेतला. सोबतचं केंद्र सरकारने महाराष्ट्रात ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ४७८ सोयाबीन खरेदी केंद्र सुरु केली. कापसाच्या एमएसपीत ५०१ रुपयांची वाढ केलीय. म्हणजेच कापसाला आता प्रतिक्विंटल ७५२१ भाव निश्चित केलाय. सरकाराच्या निर्णयाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.



